Dharma Sangrah

औरंगाबादमध्ये तणाव, दगडफेकीत २५ जण जखमी

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (09:06 IST)
औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते.  दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

समाजकंटकांनी दुकाने तसेच वाहनांची जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत स्थानिक तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एकूण २५ जण या दगडफेकीत जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IND vs ENG मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुमराहच्या सहा चेंडूंनी इंग्लंडचा पराभव केला

धक्कादायक : इगतपुरी वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांकडून पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

नागपूर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे विधानसभेत गोंधळ, २२ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी बंद करण्याचे आदेश

Sukhoi Fighter Jet: आसाममधील कार्बी आंगलोंग येथे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले, पायलट बेपत्ता; शोध सुरू

IRIS Dena हिंदी महासागरात अडकलेल्या खलाशांच्या शोधात भारतीय नौदलाने श्रीलंकेसोबत शोध मोहीम राबवली

पुढील लेख
Show comments