Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजेच्या टॉवरवर चढून गावकऱ्यांचे आंदोलन

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (17:00 IST)
बुलडाणातील ढालसावंगी गावातील नागरिक गेल्या तीन महिन्यापासून गावात अंधार असल्यामुळे हैराण झाले आहे. या गावाकडे महाराष्ट्र वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. गावात वीज मिळावी यासाठी गावकरांनी वीजवितरण कंपनी कडे तक्रार चे निवेदन दिले असून अद्याप या गावाकडे वीजवितरण कंपनीचे काही लक्ष नाही. ग्रामस्थानानी कंटाळून आणि चिडून तीव्र आंदोलनाची भूमिका घेत थेट विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. 

ढालसावंगी गावातील विजेचे तीन फिडर असून ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहे. ते बदलून देण्याची मागणी गावकरांनी केली होती. ते बदलले गेले नसल्यामुळे गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. गावात अंधार असल्यामुळे गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वीजमंडळ कार्यालयाच्या फेऱ्या करून देखील गावात अद्याप वीज आलेली नाही. या वर कठोर भूमिका घेत गावातील नागरिकांनी विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं आणि फिडर बदलून गावात वीज आली नाही तर मोठं आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.   

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments