Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्र सरकारकडून मदत करताना होणारा दुजाभाव लपून राहिलेला नाही : अजित पवार

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:59 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून मदत करताना होणारा दुजाभाव लपून राहिलेला नाही, अशी टीका पूरग्रस्तांच्या मदतीवरुन मोदी सरकारवर केली आहे. आपण मागणी करताना साधरण जे काही नुकसान झालं असतं त्या अनुषंगाने मागणी करत असतो. किती निधी द्यायचा हा अधिकार केंद्राचा आहे, असं देखील अजित पवार म्हणाले. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.
 
“आपण मागणी करताना साधरण जे काही नुकसान झालं असतं त्या अनुषंगाने मागणी करत असतो. किती निधी द्यायचा हा अधिकार केंद्राचा आहे. एक गोष्टी खरी आहे की काही राज्यांनी न मागता तातडीची मदत म्हणून हजारो कोटींची मदत जाहीर केली. सर्वच राज्यांच्या बाबतीमध्ये एकसारखी भूमिका केंद्राने घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरेल. भारत सरकार हे देशाचं सरकार असतं. राज्यासोबत भेदभाव करु नये. त्यांच्या निर्णयानंतर त्रयस्थांना, माध्यमातील लोकांना किंवा सहकाऱ्यांना पण वाटतं की याच्यात कुठेतरी भेदभाव होतोय, तसं होता कामा नये,” असं अजित पवार म्हणाले.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments