Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा शिंदे मंत्रिमंडळाचा निर्णय

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (12:58 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.ठाकरे सरकार ने शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिली होती. त्या निर्णयावर निर्णय घेत शिंदे- फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव  धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णयावर पुननिर्णय घेण्यात आला. या सदंभात लवकर ठराव करून प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवले जाणार अशी माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयांना मंजुरी देईल.असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर स्थगिती  दिली होती. कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतले जाण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.  
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments