Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय धाडसी - सरन्यायाधीश

Webdunia
रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:31 IST)
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत धाडसी निर्णय होता, असं सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी म्हटलं आहे.अलाहाबाद हायकोर्टानं 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशात 2 वर्षांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती, असं रमण्णा म्हणाले.
 
जस्टीस जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याबाबत निर्णय दिला होता आणि हा अत्यंत धाडसी निर्णय होता असं रमणा म्हणाले.
 
निवडणुकीतील गैरप्रकारांप्रकरणी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांना न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं. तसंच त्यांना सहा वर्ष कोणतंही पद स्वीकारण्यासही अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षांची आणीबाणी लावण्यात आली, असंही रमण्णा यांनी सांगितलं.
 
अलाहाबाद उच्च न्यायालयातील नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात रमणा यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचीदेखील पायाभरणी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही यावेळी उपस्थिती होती.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments