suvichar

पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:51 IST)
पणजी, वास्को, वाळपई, धारबांदोडा : गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच असून परिस्थिती अग्निशामक दलाच्या आवाक्याबाहेर जात आहे. आगीमुळे अनेक डोंगर भस्मसात होऊन गेले आहेत. कोट्यावधी रुपयांची हानी झाली असून वनस्पतींच्या दुर्मीळ जाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सत्तरीतील काही डोंगरांवरील आगी आटोक्यात आल्या आहेत, मात्र नावता-कुठ्ठाळी, पर्रा व साकोर्डे येथे नव्dयाने वणवा पेटला आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी आगी नैसर्गिकरित्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा घेतलेल्या आढावा बैठकीत कृत्रिम आगीची शक्यता फेटाळली नाही. दरम्यान बुधवारी पिसुर्ले येथील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुठ्ठाळीत डोंगराला आग लागली.  पर्रा डोंगराला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पारवाड कर्नाटकमार्गे लागून आलेली आग गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने विझविण्यात यश आल्याने काही डोंगर वाचले आहेत. वाघेरी डोंगराला लागलेली आगही आता नियंत्रणात आली आहे.
 
गोव्यात विशेषत: सत्तरीतील डोंगराना तीन दिवसात अनेक ठिकाणी ज्या आगी लागल्या त्यावरून संशय निर्माण झालेला आहे. काल बुधवारी आगीचे प्रकार अन्य तालुक्यांमध्ये म्हणजे धारबांदोडा, मुरगाव व बार्देश तालुक्यातही घडले. वनखात्याने नौदलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर करून डोंगरावर पाण्याचे फवारे उडवून आग आटोक्यात आणली. आणखी विस्तारली जाऊ नये यासाठी नौदलाची दोन हॅलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

'विहिरीत अनेक मृतदेह दिसतायेत...'; गावात उडाली खळबळबळ, कौटुंबिक कलह आणि ५ मृत्यूंची धक्कादायक कहाणी समोर

नवरदेवाने परतफेड भेट म्हणून संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले

ठाणे विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित; क्षितीज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

कांदा प्रश्न चिघळला: चांदवडमधील महामोर्च्यात आक्रमक निदर्शने; आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

पुढील लेख
Show comments