Dharma Sangrah

पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:51 IST)
पणजी, वास्को, वाळपई, धारबांदोडा : गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच असून परिस्थिती अग्निशामक दलाच्या आवाक्याबाहेर जात आहे. आगीमुळे अनेक डोंगर भस्मसात होऊन गेले आहेत. कोट्यावधी रुपयांची हानी झाली असून वनस्पतींच्या दुर्मीळ जाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सत्तरीतील काही डोंगरांवरील आगी आटोक्यात आल्या आहेत, मात्र नावता-कुठ्ठाळी, पर्रा व साकोर्डे येथे नव्dयाने वणवा पेटला आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी आगी नैसर्गिकरित्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा घेतलेल्या आढावा बैठकीत कृत्रिम आगीची शक्यता फेटाळली नाही. दरम्यान बुधवारी पिसुर्ले येथील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुठ्ठाळीत डोंगराला आग लागली.  पर्रा डोंगराला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पारवाड कर्नाटकमार्गे लागून आलेली आग गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने विझविण्यात यश आल्याने काही डोंगर वाचले आहेत. वाघेरी डोंगराला लागलेली आगही आता नियंत्रणात आली आहे.
 
गोव्यात विशेषत: सत्तरीतील डोंगराना तीन दिवसात अनेक ठिकाणी ज्या आगी लागल्या त्यावरून संशय निर्माण झालेला आहे. काल बुधवारी आगीचे प्रकार अन्य तालुक्यांमध्ये म्हणजे धारबांदोडा, मुरगाव व बार्देश तालुक्यातही घडले. वनखात्याने नौदलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर करून डोंगरावर पाण्याचे फवारे उडवून आग आटोक्यात आणली. आणखी विस्तारली जाऊ नये यासाठी नौदलाची दोन हॅलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

पुढील लेख
Show comments