Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (15:32 IST)
राज्य सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, प्रवीण दरेकरांवर जर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येत असेल तर त्याची मी यादी तयार केली आहे. गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये १०३ जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील. त्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ९० जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आज आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यावर यश मिळवतो, त्यामुळे गृहमंत्र्यांनी देखील टीका केली आहे. तसेच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राऊतांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं केली त्यावर चौकशी करावी. याबाबत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
तुमचं सरकार येऊन २७ ते २८ महिने पूर्ण झाले आहे. तरीदेखील तुम्ही रोज धमक्याच देत आहात. नवाब मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये राहून २० दिवस झाले असले तरी देखील तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही आहात. काल हाय कोर्टाने मलिकांचा जामीन नाकारला. जर तुम्हाला त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल आणि जर दाऊदचा दबाव असेल तर त्यांचं खातं तरी काढून घेऊ शकता, असं पाटील म्हणाले.
 

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments