Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या घराबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:20 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
दरम्यान फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे. विदर्भवादी आंदोलकांना वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात अडवण्यात आलं आहे. संविधान चौकापासून आंदोलकांचा लाँग मार्च सुरु झाला.  सुरुवातीला मोर्चा शांततेनं निघाला होता, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
 
आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
 
‘या’ आहेत प्रमुख मागण्या:
 
वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कांद्याच्या दरावर सरकार पकड घट्ट करणार, अनेक शहरांमध्ये कांद्याने 50 रुपयांचा टप्पा ओलांडला

Porsche car Accident Case : पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट,अल्पवयीन आरोपीने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिला

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

पुढील लेख
Show comments