Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाजीराजे छत्रपतींवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - दिलीप वळसे पाटील

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (23:08 IST)
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही, असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं.
 
त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय, "छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता."
संभाजीराजे यांनीही यानंतर हा विषय संपला असल्याचं म्हटलं आहे.
 
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. पण त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसं केलं असावं."
 
"मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे," असंही ते म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर दौरा करत आहेत.
 
यादरम्यान त्यांनी आज (31 मे) ट्वीट करत म्हटलं, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
 
"माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?", असाही सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.
आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर आपलं समाधान झाल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments