Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर विरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (12:50 IST)
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीही 7 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नामांतराच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.
 
आता औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद धारावी नावानेच कायम ओळखले जाणार .नामांतरणाच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा नकार सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नाव बदलण्याचे अधिकार राज्य सरकारचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

राज्य सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. नामांतराच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली असून याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच राज्य सरकार कडून घेण्यात आलेला निर्णय योग्य आहे असे न्यायालयाने निर्णय दिले. 

याचिकाकर्त्यांनी मुंबई न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली असून आज सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकांवर निर्णय देत याचिका फेटाळून लावली आहे. 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments