Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून

Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (08:15 IST)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर तिसऱ्या दिवशी सुनावणी पूर्ण झाली. यावेळी ५ सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावर आता निकाल कधी देणार? हे खडंपीठाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. गेल्या ३ दिवसांपासून सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणे अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण ७ सदस्यीय खंडपीठाकडे जाणार की नाही? यावरच युक्तीवाद पूर्ण झाला.
 
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली. पुन्हा ५ न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का? यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज शिंदे गटाने युक्तीवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

मॉस्कोमध्ये ISIS च्या 2 कैद्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले

गुरपतवंत सिंग पन्नू प्रकरण : आरोपी निखिल गुप्ताला अमेरिकेत नेण्यात आलं, भारताच्या अडचणी वाढतील?

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

राहुल गांधी रायबरेली तर प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील खरगे यांची घोषणा

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments