Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते

The wait
Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (15:16 IST)
मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालय मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गृहमंत्रीपदाचाच तिढा होता आणि तो आता सुटल्याचे समजते.
 
रविवारीच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मंत्रिमंडळाचा विस्तार इतक्या लवकर होऊ शकतो, ज्याची तुम्ही लोकांनी कल्पनाही केली नसेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मंत्रिपरिषद स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळण्याची चर्चा आहे.
 
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवासांपासून दिल्लीत होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. या बैठकीला देशभरातून एकूण २३ मुख्यमंत्री आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. तसेच, जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक कामे खोळंबल्याचे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक-दोन दिवसातच करण्याचे निश्चित झाले आहे. गृहमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाकडूनही होत होती. मात्र, मुख्यमंत्रीपद शिंदे यांना दिल्याने भाजपने गृहमंत्रीपद स्वतःकडे घेण्याची भूमिका ठेवली होती. आता हा तिढा सुचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यपाल सुद्धा महाराष्ट्रात परतले आहेत. येत्या १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील वादाची सुनावणी होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक

आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या

पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments