Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे दिले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (15:50 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत वाझे-देशमुख यांच्या भेटीचे आरोप खोटे आहेत. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपासून रुग्णालयात होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन होते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत पवारांच्या म्हणण्यानुसार देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कोणी घेतली? असा सवाल केला. या सगळ्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
मला कोरोना झाल्याने नागपूरच्या अलेक्सिस रुग्णालयात ५ फएब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे रुग्णालयात होतो. १५ फेब्रुवारीला मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडत असताना अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी नुकताच कोरोनातून बाहेर आलो होतो. माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळे मी रुग्णालयाच्या तिथेच गेटवर खूर्चीवर बसलो आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत मी गाडीत बसलो. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन होतो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पडलो. सह्याद्री गेस्ट हाऊसला मी बैठकीला गेलो, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं.
 
अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटसंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. याबाबतचं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं होतं. हेच ट्विट रिट्विट कर फडमवीस यांनी सवाल केला आहे. “१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असं पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संबंधित माहिती

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

पुढील लेख
Show comments