Festival Posters

Jalgaon News एकाचवेळी तीन भावांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (18:01 IST)
Three brothers died simultaneously श्रावण सोमवार  निमित्तजळगाव जिल्ह्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर  कावड यात्रेत सहभागी होण्यापूर्वी नदीत अंघोळीसाठी गेलेले तीन तरुण तापी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 
 
एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पियुष रवींद्र शिंपी, सागर अनिल शिंपी, अक्षय प्रवीण शिंपी अशी या तिघांची नावे आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजता भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाली. ही यात्रा रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोचली. तेथे तरुणांनी रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले.  सर्व पूजा अर्चा झाली. त्यानंतर पियुष, सागर आणि अक्षय हे तिघेही पोहण्यासाठी तापी नदीपात्रात उतरले. त्यावेळी एकजण वाहून जात असल्याचे इतर दोघांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिघेही पाण्याच्या प्रवाहात (Drowned) वाहून गेले. 
 
यावेळी नदी काठावर असलेल्या काही जणांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ते तिघेही वाहून गेले होते.  तिघांचा शोध सुरू असताना संध्याकाळी पाच वाजेदरम्यान त्रिवेणी संगमानजीक एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या काही अंतरावर दुसरा मृत्यू सापडला. तर आज सकाळी तिसरा मृतदेह पथकाच्या हाती लागला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments