Marathi Biodata Maker

एकाच दिवशी तिघांची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (18:40 IST)
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नैराश्यातून त्यांनी गळफास लावून हे टोकाचे पाऊल घेतल्याचे समजले आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. ते धारूरच्या गावंदरा गावातील रहिवासी होते. सुरेश रामकिसन बडे(37)असे या मयत शिक्षकाचे नाव आहे. सुरेश यांनी पहाटे 3 वाजेच्या सुमारास माजलगावच्या जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथे लोखंडी आडूला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. तर माजलगाव तालुक्यात कृष्णा बाळासाहेब कोको या 19 वर्षीय तरुणाने कमरेच्या बेल्टचा गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. तर माजलगावातील राजेगाव येथे रामचंद्र धुराजी गरड या 40 वर्षीय व्यक्तीने आर्थिक जाचाला कंटाळून शेतातील असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले.  एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments