Festival Posters

एकनाथ शिंदेनी चालवला समुद्र किनाऱ्यावर ट्रॅक्टर

Webdunia
शनिवार, 9 डिसेंबर 2023 (20:40 IST)
सध्या मुंबईत स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि सुंदर मुंबई अशी ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरी पालिकेने स्वछता मोहीम हातात घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात धारावी मधून शुभारंभ करण्यात आला असून आज या मोहिमेचा दुसरा टप्पा करण्यात आला. 
जुहूचौपटी येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हार घालून या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या किनारी स्वच्छ करणारे यंत्र ट्रॅक्टर चालवून स्वतः स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी पालकमंत्री दीपक केसकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, महापालिका आयुक्त इकबाल चहल उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्कॉन मंदिराची भेट घेऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांचा सत्कार मंदिरच्या विश्वस्तांकडून करण्यात आला व मुख्यमंत्र्यांची ग्रंथतुला करण्यात आली. 
 
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच विभागात सकाळी 7 ते दुपारी 2 वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत निवडलेल्या विभागातील रस्ते -पदपथ धूळमुक्त करण्या सोबत बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, फेरीवाला विरहित क्षेत्र, डेब्रिज मुक्त परिसर, केबल्सचे जाळे हटवणे सारखी कारवाई करण्यात येणार आहे. 

Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments