Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्य नेहमी जिंकते - नवाब मलिक

Truth always wins - Nawab Malik
Webdunia
गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (13:22 IST)
राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यात आले. आता न्यायालयीन लढाई लढली जात आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. सत्य नेहमी जिंकते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनिल देशमुख प्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
अँटिलिया बॉम्ब प्रकरण हे का घडवण्यात आले. त्याची कारणे काय? परमवीरसिंग यांचा त्यामध्ये रोल काय आहे. एनआयए काय सत्य लपवत आहे आणि परमवीरसिंग यांना केंद्रसरकार का वाचवत आहे हे सत्य न्यायालयीन लढाईतून समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.
 
केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर होतो. कसं बदनाम केलं जातं आणि अडचणीत आणायचं व सरकारला बदनाम करायचं हे यावरून स्पष्ट दिसत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
 
राज्यातील आयटी घोटाळ्यातील सुत्रधार अमोल काळे व इतर भारत सोडून पळून गेले आहेत. काही दुबईत तर काही लंडनला आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. या लोकांची गृहखात्याकडून चौकशी सुरू होईल त्यावेळी त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रसरकारच्या माध्यमातून राज्यसरकार प्रयत्न करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरे संतापले; सरकारला हा इशारा दिला

बुलढाण्यात केसानंतर नखे गळू लागल्यामुळे लोकं घाबरले

LIVE: चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री

चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल

‘प्रवाशांच्या सोयीसुविधांशी तडजोड नाही’: प्रताप सरनाईक यांनी MSRTC ला बस मार्गांवरील अस्वच्छ आणि महागड्या हॉटेल्सचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments