Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

Webdunia
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (11:07 IST)
भाजपला सत्तेत येण्याची घाई झालेली असल्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सगळ्या मार्गाचा अवलंब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला.
 
छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच अनिल देशमुखही निर्दोष सुटतील. त्यांनी काहीही केलेलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र नेत्यांचा मानसिक छळ आणि सरकारला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचंही पाटील म्हणाले.
 
समीर वानखेडे प्रकरणाबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, कारवाईत मराठी-अमराठी मुद्दा नसतो. भुजबळ यांना ईडीनं 28 महिने तुरुंगात ठेवलं, तेही मराठीच होते. त्यामुळं नियमानुसारच सर्वकाही होणार.
जयंत पाटील सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
 
जिल्हा परिषदेत आघाडीवर राष्ट्रवादीचा जोर असून मविआमधील तिन्ही पक्ष सामंजस्याने काम करतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
 

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments