suvichar

नाशिकमध्ये दोन अपघात, पाच ठार

Webdunia
बुधवार, 11 मे 2022 (21:46 IST)
नाशिकमध्ये दोन अपघात झाले असून त्यात पाच जणांनी जीव गमावला आहे. पहिला अपघात मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावरअपघात झाला. झाडावर कार आदळून झालेल्या या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर पाचवा मित्र गंभीर जखमी झाला आहे.  त्याला उपचारासाठी मनमाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेत पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते. परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.  कारने झाडाला दिलेली धडक इतकी भीषण होती, की गाडीतून प्रवास करणारे पाचपैकी चौघे जागीच मृत्युमुखी पडले. पुणे-इंदोर महामार्गावर अंकाई किल्ल्याच्या बाजूने मनमाडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. यात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
दुसरा अपघात नाशिक – मुंबई लेनवर नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या वळणावर पहाटेच्या सुमारास क्रुझरचा अपघात झाला. MH 22 U 2801 या क्रमांकाचे हे वाहन भरधाव वेगात जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने वाहन पलटी होऊन रोडच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला आदळुन अपघात झाला. या अपघातात दर्शना विजय कांबळे वय ११ वर्ष रा. मंठा जि. जालना ही मुलगी ठार झाली तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments