Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन शेतकरी भावांनी नेले पहिल्यांदा रायरेश्वराच्या किल्ल्यावर ट्रॅक्टर

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (12:47 IST)
ट्रॅक्टर शेतात कामासाठी वापरले जाणारे साधन आहे.शेतीकामात सोय व्हावी या साठी ट्रॅक्टर वापरले जाते. भोर तालुक्यात किल्ले रायरेश्वर पठारावर शेतीसाठी चक्क 4  हजार 694 फूट उंचीवर शेतीसाठी ट्रॅक्टर नेले आहे. ज्या किल्यावर जाण्यासाठी साधी पायवाट नाही या किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या, लोखंडी शिडीचा वापर केला जातो. किल्ल्यावरून  ये-जा करताना जीव मुठीत घ्यावा लागतो. 

त्या रायरेश्वराच्या किल्यावर किल्ला परिसरात पसरलेल्या पठारावर राहणाऱ्या कुटुंबांना शेतीकामाच्या सोयीसाठी किल्ल्यावर राहणाऱ्या दोन शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टर खरेदी करून आणले आणि थेट 4 हजार 694 फूट उंच किल्यावर नेण्याचे धाडसी काम केले आहे. अशोक जंगम आणि रवींद्र जंगम असे या भावांचे नाव आहे. 

हे भाऊ शेतीचा व्यवसाय करतात आत्ता पर्यंत पारंपरिक पद्धतीने शेतीचे काम व्हायचं आता त्याला यांत्रिकरणाची जोड मिळाली आहे. त्यांनी ट्रॅक्टर विकत घेतले आणि आता ट्रॅक्टर वर कसे न्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी ग्रामस्थांची मदत घेऊन ट्रॅक्टरचे मोठे पार्ट वेगळे करून किल्यावर जाऊन एकत्र करण्याचा विचार केला आणि ट्रेक्टरचे अवजड पार्ट वेगळे करून ट्रॅक्टर किल्ल्यावर लोखंडी पायऱ्या चढून जाऊन  किल्यावर पोहोचल्यावर पुन्हा जोडण्यात आले .अशा प्रकारे इतिहासात प्रथमच रायरेश्वराच्या किल्ल्यावर ट्रॅक्टर आणले. 
या भावांच्या किमयाची चर्चा आणि कौतुक सर्वत्र केले जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

Pune Porsche Case:अल्पवयीन मुलाच्या आजोबा आणि वडिलांना जामीन मंजूर

सराईत गुन्हेगाराच्या खुनाप्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

दानवेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपचा आक्षेप, कामकाज 3 वेळा तहकूब

गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात

सर्व पहा

नवीन

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 60 लोक मृत्युमुखी, अनेक जखमी

लोकसभा अध्यक्ष सदस्यांचा माइक बंद करू शकतात का? माइकचं नियंत्रण कोणाकडे असतं?

नुसरत फतेह अली खान यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी रिलीज होणार 4 कव्वाली, कसा सापडला हा अल्बम?

हाथरसच्या सिकंदरराव येथे सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू,शेकडो जखमी

सेबीकडून नोटीस मिळाल्यानंतर हिंडेनबर्गने अदानी प्रकरणात कोटक बँकेचे नाव ओढले

पुढील लेख
Show comments