Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (09:28 IST)
मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्सप्रकरणी राज्यात गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात परस्पर आरोप-प्रत्यारोपाची फेरी झाडत असतात. नुकतंच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर  गंभीर आरोप केले होते. या आरोपाला फडणवीस यांनी उत्तर दिले होते. मलिकांनी लवंगी फटाके फोडले, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या विधानानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काहीजण बॉम्ब फोडणार आहे, असं समजतंय. फोडा काय बॉम्ब फोडायचे आहेत. पण, पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडणार ते सांगा आधी? मी त्याची वाट बघतोय. दिवाळीला राजकीय फटाक्यांची गरज नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
 
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गेल्या दीड वर्षात कोरोना होता. आता जरा शांतता आहे. पण, पाश्चिमात्य देशात तिसरी लाट आली आहे.लस न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच बाहेरच्या व्हेरीयंटची आपल्यालाही भीती आहे.पहिली लाट आली तेव्हा सगळे मिळून ऑक्सिजन, बेड सर्व होते. मात्र, त्यानंतर ते सर्व कमी पडायला लागलं.कोरोनावर अजून औषध नाही. ऑक्सिजनचे सव्वा लाख बेड उपलब्ध आहेत.पण, कोरोनाचा पीक होता त्यावेळी बाहेरून ऑक्सिजन मागवावे लागले होते.आता आपले स्वतःचे ऑक्सिजनचे प्लांट आहेत. कोरोनावर अजून रामबाण औषध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments