Festival Posters

याबाबत उद्धव ठाकरे पुढील दोन दिवसांत निर्णय़ घेणार

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (21:42 IST)
शिवसेनेच्या खासदारांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  पुढील दोन दिवसांत निर्णय़ घेणार असल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिलीय. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला.  याबाबत बोलताना संजय राऊत यांनी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचं स्पष्ट केलं.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत दोन्ही उमेदवारांबाबत चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मु आणि यशवंत सिन्हा या दोघांबाबत चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती उमेदवाराला आपलं पाठबळ दिलं आहे. यासंदर्भात चर्चेनंतर सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
 
मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ 12 खासदार हजर होते, तर 7 खासदार नॉट रिचेबल होते. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली.संजय जाधव आजारी आहेत, हेमंत पाटील ते पोहचू शकले नाहीत. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस असल्याने कलाबेन डेलकर येऊ शकल्या नाहीत. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. अनिल देसाई कोर्टाच्या कामासाठी दिल्लीत आहेत असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments