suvichar

याबाबत उद्धव ठाकरे पुढील दोन दिवसांत निर्णय़ घेणार

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (21:42 IST)
शिवसेनेच्या खासदारांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  पुढील दोन दिवसांत निर्णय़ घेणार असल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिलीय. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला.  याबाबत बोलताना संजय राऊत यांनी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचं स्पष्ट केलं.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत दोन्ही उमेदवारांबाबत चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मु आणि यशवंत सिन्हा या दोघांबाबत चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती उमेदवाराला आपलं पाठबळ दिलं आहे. यासंदर्भात चर्चेनंतर सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
 
मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ 12 खासदार हजर होते, तर 7 खासदार नॉट रिचेबल होते. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली.संजय जाधव आजारी आहेत, हेमंत पाटील ते पोहचू शकले नाहीत. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस असल्याने कलाबेन डेलकर येऊ शकल्या नाहीत. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. अनिल देसाई कोर्टाच्या कामासाठी दिल्लीत आहेत असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments