Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविद्यालयीन निवडणुका आता नोव्हेंबर होणार

Webdunia
राज्यात तब्बल २५ वर्षांनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुकीसाठी सुरक्षा पुरवणं शक्य नसल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती राज्याच्या गृहविभागाने राज्य सरकारला केली होती. ही विनंती लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. 
 
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि जम्मू काश्मिरमधील परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुकीपेक्षा इतर ठिकाणी सुरक्षा पुरवणं आवश्यक असल्याचं गृह विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. केंद्र सरकराने राज्यातील नक्षल भागातील सीआरपीएफच्या सहा तुकड्या जम्मू काश्मिरमध्ये तैनात केल्या आहेत.
 
सध्या राज्यातील पोलीस दलाची प्राथमिकता राज्यातील सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची असल्याचं सांगत गृह विभागाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं होतं.  गृहविभागाच्या या पत्रानंतर राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयीन निवडणुका ऑगस्टऐवजी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईत जीबीएसमुळे पहिला मृत्यू

मुंबईत जीबीएसने ग्रस्त असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे कौतुक केले, म्हणाले-आमचे चांगले संबंध

अयोध्या : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

पुढील लेख
Show comments