Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्बंधमुक्त वारीमुळे वारकऱयांचा उत्साह दुणावला

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (21:59 IST)
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी आषढी वारीला काही दिवसातच सुरूवात होणार असुन, अनेक भाविकां समवेत प्रशासन ही या वारीच्या तयारीत गुंतलेले आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षे आषाढी निमित्त काढण्यात येणाऱया पायी दिंडी सोहळय़ावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यंदा मात्र पुन्हा जोमात या दिंडीला सुरूवात होणार आहे. यंदा 15 लाखाहुन अधिक भाविकांची उपस्थिती असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
साताऱयातुन ही अनेक भाविक या पायी दिंडीत सहभागी होतात. पुरूषां बरोबरच महिला वर्गांचाही यामध्ये तितकाच सहभाग असतो. प्रत्येक दींडीमध्येजवळ 500 हुन अधिक भाविकांचा समावेश असतो. यामध्ये दि. 21 रोजी आळंदी हुन ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. तसेच दि. 20 रोजी तुकाराम महाराजांची देहु येथुन पालखी पंढरपुरासाठी प्रस्थान करणार आहे. दिंडीमध्ये सामील होण्याकरिता साताराहून भाविक दि. 19 व 20 रोजी रवाना होणार आहेत. विविध मार्गावरून निघणाऱया पालख्या 20 व्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी दरम्यान पंढरपुर येथे पोहचणार आहे

साताऱयातुन ही अनेक दिंडय़ा या आषाढी वारीमध्ये सहभाग घेण्याकरीता निघतात. यामध्ये दि. 21 रोजी आळंदी हुन पंढरपुरला माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. साताऱयातुन 99 नंबरची दींडी ही सज्जन गडहुन माऊलीच्या रथाच्यापाठीमागे असते. तसेच कुडाळ हुन 21 नंबरची दींडी निघते. तसेच काही पालख्या या तुकाराम महाराज्यांच्या सोहळय़ातुन देहु येथुन निघतात. यामध्ये निनाम पारळी, 73 नंबरची आंबेदरी दिंडी, 95 नंबरची डबेवाडी येथुन निघते. अनेक सातारकर भाविकांचा या दिंडीमध्ये सहभाग असतो.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments