Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पन्हाळगडाची ‘पुरातत्व’कडून तातडीने सर्वेक्षण सुरु

Panhala fort
Webdunia
बुधवार, 20 जुलै 2022 (15:22 IST)
कोल्हापूर :ढासळणाऱया पन्हाळगडाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने तातडीने दखल घेतली आहे. तटबंदीला जेथे जेथे आधार देण्याची गरज आहे. त्याचा अंदाजित खर्च व त्याचे आराखडे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहाय्यक संजय चव्हाण यांनी एका वृत्तपत्रास ही माहिती दिली. भारतीय पुरातत्व विभागाकडे कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा व खिद्रापूर या ऐतिहासिक स्थळांची जबाबदारी आहे. जिह्यातील अन्य गड, किल्ले राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत.
 
जिह्यातील पन्हाळगड हा देशातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. सन ११०० ते १२०० या कालावधीत राजा भोज नरसिंह याच्या कारकीर्द पन्हाळगडाची बरीच बांधणी झाली. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासातील सर्वात कसोटीचा क्षण या किल्ल्यावर घडला आहे. सिद्धी जोहारच्या वेढय़ामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सलग तीन महिन्यांहून अधिक काळ वेढय़ातील मुक्काम याच किल्ल्यावर होता. त्यामुळे पन्हाळगडाला शिवरायांच्या इतिहासात खूप महत्त्वाचे असे स्थान आहे.
 
साधारणतः १ हजार वर्षापासूनचे अस्तित्व असलेल्या या किल्ल्याने भोज शीलाहार, यादव, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाही, महाराणी ताराराणी व त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा इतिहास अनुभवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments