अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आमदारांची नावे खालीलप्रमाणे १. अमर काळे – काँग्रेस, आर्वी, वर्धा , २. भास्कर जाधव – राष्ट्रवादी, गुहागर , रत्नागिरी , ३. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर , ४ . मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी , ५. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा , ६. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण , ७. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा, ८. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर, ९. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे , १०. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर.