Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे? आजच येथे असा करा अर्ज

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (08:21 IST)
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता जिल्हा सैनिकी मुला मुलींचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या विरपत्नी व सेवारत सैनिक यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज 30 जून 2022 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सैनिकी मुला मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक पालकांनी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी संबंधित वसतिगृहातुन प्रवेश अर्ज व माहिती पत्र घेवून आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृह अधिक्षक व अधिक्षिका यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतांना डिस्चार्ज बुक, माजी सैनिक/ सैनिक विरपत्नी असल्याबाबतचे ओळखपत्र, ECHS कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहेत.
 
प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापन समितीमार्फत अर्जांची छाननी करून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, शासकीय दुध डेअरी जवळ, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड,नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments