Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

wardha : गणेश विसर्जनाला गालबोट, तिघांचा बुडून मृत्यू

It happened on Moti Nala in Mandwa village. Three people who went for Ganapati immersion in this canal died by drowning In Wardha
Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (21:43 IST)
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु होती. आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला आज सजल नयनांनी निरोप देण्यात आला. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जागो जागी विसर्जन स्थळांवर गणेश भाविकांची गर्दी उसळली आहे. गणपती विसर्जनाला गाल बोट लागण्याची धक्कादायी घटना मांडवा गावात मोती नाल्यावर घडली आहे. या नाल्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

कार्तिक बलवीर (14), अथर्व वंजारी(12) आणि संदीप चव्हाण(35) असे मृतांची नावे आहेत. हे तिघे कुटुंबासह मांडवा परिसरात मोती नाल्यावर गणपती विसर्जनासाठी गेले असता नाल्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज लागला नाही आणि कार्तिक बलवीर आणि अथर्व हे दोघे पाण्यातील गाळात जाऊन अडकले. त्यांना अडकलेलं पाहून संदीप यांनी त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घातली आणि ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाहताना पाहून संदीप सोबत आलेल्या अंजली चव्हाण यांनी आरडाओरड करायला सुरु केले. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण तो पर्यंत तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments