Festival Posters

पुण्यात तीन दिवस पाणी नाहीच फक्त एकच पंप सुरु

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:00 IST)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु झाला आहे. पाणी उपसा करणारा एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु आहेत, अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच राहणारा असून, पाटबंधारे विभागाच्या एककल्ली  कारभार यामुळे  शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाली असून समस्त पुणेकर हैराण झाले आहेत. पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी लवकरच बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकर नागरिकांनी  पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला तर, पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे आता नागरिकांना पाणी सर्व कारणे पाहता योग्य पद्धतीने वापरावे लागणर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले

पश्चिम आशियात अडकलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारचा मदतीचा हात; मुख्यमंत्री परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवत आहे

LIVE: इराण हल्ल्यानंतर जालनाचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले

ठाण्यात पालकांनी फटकारल्यानंतर १३ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली

World Wildlife Day जागतिक वन्यजीव दिन

पुढील लेख
Show comments