Marathi Biodata Maker

पाणी स्थिती गंभीर चोरट्यांनी चोरले पाणी, पोलिसांत तक्रार

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (09:36 IST)
पूर्ण राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आता यात भर म्हणून पाण्याच्या चोरीची भर पडली आहे. चोरांनी आता साठवलेल्या पाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
 
मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात अशीच एक घटना घडली असून, घटनेत चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या ३०० लिटर पाण्यावर डल्ला मारला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या या  घटनेमुळे नागरिकांना धक्का बसला आहे.
 
या चोरी प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ  गाठल्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात २२ ते २५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पालिकेतर्फे दिले जाणारे हे पाणी एक महिना पुरवावे लागते. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी घरातील ग्लासा पासून मोठ्या भांडया पर्यंत पाणी भरून ठेवण्यासाठी घरातील सर्वच जण धडपड करतात.
 
विलास आहिरे यांनी त्यांच्या छतावर असलेल्या टाकीत पाणी भरून ठेवले होते. त्यांचा घराचा  जिना बाहेरून असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जावून टाकीत भरून ठेवलेल्या ५०० पैकी ३०० लिटर पाणी चोरून पसार झाले आहेत. सकाळी टाकीतून पाणी येत नसल्याचे पाहून आहिरे छतावर जावून पहिले असता टाकीत पाणी नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत रीतसर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला आहे. यामुळे आता पाण्याला सुरुक्षा देणे गरजेचे झाले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

कस्तुरबा मोहनदास गांधी यांची माहिती

एसटी बस प्रवास आता 'स्मार्ट'; १ एप्रिलपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

"झाडे तोडणे हे सैनिकांच्या बलिदानासारखे आहे," या पंकजा मुंडे यांच्या विधानावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली

LIVE: आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र

सावकाराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

पुढील लेख
Show comments