Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, चांगला माणूस घडवायचाय- मोहन भागवत

Webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:14 IST)
आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाहीये तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. छत्तीसगढ येथे आयोजित घोष शिबिरात ते बोलत होते.
"आपण भारतभूमीत जन्मलो आहोत. आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला द्यायची आहे", असं त्यांनी सांगितलं.
"भारताला विश्वगुरु बनवायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. देशाची व्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न असेल तर ते योग्य नाही.
पूजा-उपासना यामध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून मिसळून राहण्याची शिकवण देते. कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची शिकवण देता येऊ शकते. हरवलेलं व्यावहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकतं, "असं त्यांनी सांगितलं

संबंधित माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments