Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती :शैलेश टिळक

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (22:00 IST)
social media
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. त्यासाठी भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश  टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमेदवारी न मिळाल्यामुळं अन्याय झाल्याचं सांगतानाच शैलेश टिळक यांना अश्रू अनावर झाले आहेत.
 
मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्यानं आम्ही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु आम्हाला तिकीट देण्यात आलेलं नाही. त्याचं कारण काय आहे, हे आम्हाला माहिती नाही. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाल्याचं सांगताच शैलेश टिळकांचा कंठ दाटून आला.
 
गेल्या २० वर्षांपासून मुक्ता टिळक या मतदारसंघात काम करत होत्या. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती. परंतु ते होऊ शकलेलं नाही. परंतु आता पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही भाजपचं काम करणार असल्याचं शैलेश टिळक म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments