rashifal-2026

अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे वाचा सविस्तर

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2023 (21:43 IST)
अजित पवार हे एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.
 
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर सुप्रिया सुळे आज प्रथमच मुंबईत आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली. यावेळी बोलतांना अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
दीपक केसरकरांनी अजित पवार यांना दिलेल्या खुल्या ऑफरबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
 
त्याचबरोबर अजित पवार यांच्याबद्दल मला अतिश आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, असंही केसरकर म्हणाले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments