Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..... त्याला आपण तरी काय करणार?: उद्धव ठाकरे

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (11:31 IST)

मुंबईतील खड्डे, ठिकठिकाणी साचणारे पाणी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही पाऊस जास्त पडत असल्यामुळे होत असल्याचे सांगत शेवटी पावसावर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खापर  फोडले आहे. मुंबईत पाऊसच इतका पडतो, त्याला आपण तरी काय करणार? असा उलटा सवाल त्यांनी विचारला. मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. 

मुंबई महापालिका कायम टीकेची धनी होते. जरा काही झालं की बीएमसीवर खापर फुटतं. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गेल्याच आठवड्यात रेड एफएमची आरजे मलिष्कानं विडंबनपर गाणं करुन मुंबई पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्याला शिवसेनेच्या वतीनं किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातूनच उत्तर दिलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सूचक उत्तर दिलं आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments