Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुठे गेलं मुंबईवरचं प्रेम?, नितेश राणे यांचे ट्वीट

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (22:49 IST)
मुंबईतल्या पावसावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत  मुंबईवर संकट ओढावलं असताना सेलिब्रिटी कुठे आहेत?, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
 
“मुंबईत मुसळधार पाऊस असताना एकाही सेलिब्रिटीने परिस्थितीवर पोस्ट किंवा ट्वीट केलेलं नाही, हे कसं काय?, का फक्त पैशांसाठी त्यांच्या डायलॉगप्रमाणे सर्व पोस्ट स्क्रिप्टसारख्या लिहिलेल्या असतात. कुठे गेलं मुंबईवरचं प्रेम?” असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
 
दुसरीकडे  भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विटरवरुन एका जुन्या बातमीच्या आधारे शिवसेनेला टोला लगावला आहे. प्रसाद लाड यांनी, “ये मुंबई है… ये सब जानती है…” असं म्हणत सामना या वेबसाईटच्या २०१७ च्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २०१७ मध्ये मुंबईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, असं वृत्त दिसत आहे. “२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार… आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…”, असं ट्विट केलं आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments