Dharma Sangrah

सत्तेत असो वा नसो, सन्मार्ग सोडता कामा नये : देवेंद्र फडणवीस

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (16:02 IST)
आपण सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सन्मेगो सोडता कामा नये, असे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीमध्ये म्हटले आहे. सन्मार्गवर राहायचे असेल तर सन्मार्गवर चालण्याचे टॉनिक मिळते, त्यामुळे ते टॉनिक घेण्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. स्वानंद सुखनिवासी सद्‌गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाप्रसंगी बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले, ढोक महाराज यांनी सांगितले राजकारणात कमी अधिक होत असते. सत्तेतले सत्तेच्या बाहेर जातात तर कधी बाहेरचे सत्तेत येतात. पण, माझे एक मत नेहमी असते, आपण सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर असो, सन्मार्ग सोडता कामा नये. तसेच, लोकांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. असे म्हणत लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच आणि येतोच, असेही त्यांनी  ठामपणे सांगितले. 
 
मी माझ्या जीवनात कधीही सत्कार स्वीकारत नाही. मी अनेक काम केली असतील पण सत्काराला नाही म्हणतो. याबद्दल माझे नेहमी असे मत आहे की, सत्कार तेव्हाच स्वीकारायला पाहिजे जेव्हा आपण सत्कार्य करतो आणि आपल्या जीवनामध्ये केलेले कार्य हे कर्तव्य आहे. कर्तव्याचा सत्कार होऊ शकत 
नाही. ज्यादिवशी खर्‍या अर्थाने सत्कार्य आपल्या हाताने होईल त्या दिवशी सत्कार स्वीकारला पाहिजे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments