rashifal-2026

वाचा, फडणवीस यांनी पडळकरांना का बोलावून घेतले

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:33 IST)
जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जेजुरी संस्थान आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातला वाद समोर आला होता. या प्रकरणात  पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीकाही केली होती. अहिल्यादेवी आणि शरद पवार यांच्या विचारात साम्य नसल्याची टीकाही पडळकरांनी केली होती. पण शरद पवारांवर केलेली टीकेवर भाजपने त्यांची पाठराखण केली आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या विधानावर कोणताही आक्षेप घेण्यासारखे ते वक्तव्य नसल्याचे सांगत त्यांना क्लिन चिट केली आहे. पण राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडळकरांच्या भाषेविषयी आधीच भूमिका मांडलेली आहे. 
 
शरद पवारांना लक्ष्य करताना गोपिचंद पडळकर यांची भाषा म्हणजे ती धनगर समाजाची भाषा आहे. हा समाज शरद पवारांवर चिडलेला आहे, त्या समाजाची भाषाच तशी आहे अशी पाठराखण चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पण या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या प्रसंगानंतर एक वेगळीच भूमिका घेतली होती. शरद पवारांवर गोपिचंद पडळकर यांनी टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी याआधीच्या घटनेत व्यक्त केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सोलापूरात एका दौऱ्यानिमित्ताने आले होते. या दौऱ्यातच फडणवीस यांनी पडळकरांना बोलावून घेतले. त्यावेळी पडळकर यांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments