Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, चार जणांना अटक

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (23:30 IST)
वाघाचे नखं,अवयव आणि इतर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी नागपूर वनविभागानं गेल्या दोन दिवसात चार जणांना अटक केली आहे.अगोदर नागपूर बुटीबोरी येथे कारवाई करत वनविगाच्या पथकानं दोघांना जेरबंद केले.त्यानंतर नागपूर वनविभागाने चंद्रपूर वनविभागाच्या मदतीनं पांचगाव येथून दोघांना ताब्यात घेतले. दोन दिवसांच्या या कारवाईनं नागपूर वनविभागानं या चार आरोपींकडून वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस, विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या जप्त केले आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, महाराष्ट्र वन विभागानं गेल्या आठ दिवसात वन्य प्राणी आणि त्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी 18 जणांना अटक केली आहे.              
 
बुटीबोरी वनपरिक्षेत्र कार्यलयानं 29 ताऱखेला गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत वाघाच्या 7 नखांसह महादेव आडकु टेकाम ,गोकुळदास पवार ताब्यात घेतले होते.त्यांची चौकशी केल्यानंतर चंद्रपूर वनविभागासोबत कारवाई करत पांचगाव येथून रामचंद्र आलाम, विजय लक्ष्मण आलाम यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या घरांची झडती घेतली असता वनविभागाच्या पथकाला  त्यांच्याकडे  वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, वाघाच्या कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस,  विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या आढळून आले.या आरोपींनी एका वाघाची शिकार केल्याचीही कबूली दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments