Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले म्हणाले….

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (15:45 IST)
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार का, यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे नव संकल्प शिबीरातून परतताच पटोले आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
 
पटोले यांनी आजही घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस छुप्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला मदत करीत असल्याचा आरोप पटोले यांनी यापूर्वीच केला आहे. याबाबत त्यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. पटोले आज म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचे राजकारण करत आहे. सरकारसाठी समान कार्यक्रम आम्ही निश्चित केला. मात्र, आता अडीच वर्षांनंतर लक्षात येत आहे की, ज्या मुद्द्यांवर आम्ही सरकार बनवलं होते त्याचे उल्लंघन होत आहे. याद्वारे आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचाच अपमान होत आहे. तो आम्ही कसा सहन करावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण आणि भूमिकेबाबत आम्ही सोनियाजींसह पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली आहे. त्याची योग्य ती दखल ते घेतील आणि त्याबाबत ठोस निर्णय होईल. येत्या काही दिवसातच त्याचे परिणाम दिसतील, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद आणि असमन्वयाची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments