Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय पथक येणार, पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करणार

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:15 IST)
महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी आज केंद्रीय पथक राज्यात दाखल होणार आहे. केंद्राचे हे पथक कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. केंद्राच्या या पथकामध्ये सात सदस्य असतील. यंदा झालेल्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने ६,८१३ कोटींच्या मदतीचा केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. आता केंद्र सरकारचं हे पथक पाहणीनंतर अहवाल देणार आहे . 
 
सातारा, सांगलीमध्ये पूर आला. या ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसात तब्बल ३ हजार मिलीमीटर पाऊस एवढ्या प्रचंड पावसाची नोंद महाबळेश्वर भागात झाली. तर जुलै आणि ऑगस्ट या पंधरा दिवसात म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात ६ हजार मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरच्या भारतीय हवामान विभागात झाली आहे. तसेच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली. तसेच अल्लमटी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली होती. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उद्धव सरकार फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचा कट रचत होते! माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या अहवालात खुलासा

मतदानाची अधिकृत वेळ जाहीर; सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत नागरिकांना मतदान करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

बदलापूर घटनेतील आरोपींचा शिरच्छेद झाला पाहिजे, कालीचरण महाराजांचे विधान

LIVE: मतदानाची अधिकृत वेळ जाहीर

पुढील लेख
Show comments