Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

Webdunia
रविवार, 30 जून 2024 (13:06 IST)
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपल्या 9 महिन्यांच्या मुलाला विष पाजले.सुदैवाने या घटनेत मुलगा बचावला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

या प्रकरणी मयत महिलेच्या आईने मुलीचा छळ केल्याचा आरोप सासरच्यांवर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सदर प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बीके गावातील आहे. घरात कोणीही नसताना आत्म्हत्यापूर्वी महिलेने आपल्या 9 महिन्याच्या मुलाला कीटकनाशक पाजले. नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियातील सदस्यांनी घरी आल्यावर तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पहिले आणि याची सूचना पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला आणि मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी महिला मृत घोषित केले. मुलाला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात पाठविले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी महिलेच्या आईने महिलेच्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली असून छळ करण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरच्या लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वर्गशिक्षिकाने विद्यार्थ्याला घरी बोलावून प्रॅक्टिकलच्या नावाखाली हे केले काम, कारवाई करण्याची मागणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

ओम बिर्ला : लोकसभा अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाचीही वादानं सुरुवात

सर्व पहा

नवीन

बेलग्रेडमध्ये इस्रायली दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला, गोळीबारात हल्लेखोर ठार

विम्बल्डनमध्ये सुमित नागलला कठीण ड्रॉ, पहिल्या फेरीत या खेळाडूशी सामना होईल

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

पुढील लेख
Show comments