Marathi Biodata Maker

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (12:19 IST)
सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने झडी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा साखरा परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. 

तर पन्नास हेकटरवरील शेतीत कापूस, उडीद, मूग, सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून साखरा शिवारात शेतात पतीसोबत काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर वीज कोसळून तिचा जागीच दुर्देवी अंत झाला.तर महिलेचा पती गंभीर भाजला आहे.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments