Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : वर्षा गायकवाड

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (16:35 IST)
इयत्ता दहावीची २९-४-२०२१ ते २०-५-२०२१ दरम्यान होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर २३-४-२०२१ ते २१-५-२०२१ दरम्यान होणारी बारावीची परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. अशी महत्वाची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत दिली. यासह त्यांनी असेही सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात देता येणार आहे. 
 
नेहमी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ३ तासांचा कालवधी असतो मात्र यंदा तो कालावधी ३० मिनिटांनी अधिक वाढवून देण्यात आलेला आहे. याबरोबर ४० आणि ५० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा कालावधी वाढून देण्यात आला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचीही माहिती शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली. यासोबतच, दहावी, बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा (प्रॅक्टिक्ल परीक्षा) ही लेखी परीक्षेनंतर असाईनमेंट पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे असाईनमेंट या लेखी परीक्षेनंतर शाळेतच गृहपाठ पद्धतीने विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments