Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे यलो अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (09:48 IST)
हवामान खात्यानं उद्या म्हणजे 4 सप्टेंबर पासून राज्यात सलग तीन दिवस पावसाचा जोर असण्याची शक्यता वर्तवली आहे.राज्याच्या बुलढाणा, अमरावती,अकोला,यवतमाळ,वाशिम,या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.तर 5 सप्टेंबर रोजी बीड,लातूर,परभणी,सोलापूर,नांदेड,सिंधुदुर्ग आणि सांगली मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
हवामान खात्यानं पुणे,सातारा,रत्नागिरी,अहमदनगर,मराठवाड्यात 5 सप्टेंबरसाठी   यलो अलर्ट जारी केला आहे.6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.या साठी यलो अलर्ट जारी केले आहे.
 
महाराष्ट्रात यंदा सप्टेंबर महिन्यात पुढील चार दिवस बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाब पट्टा निर्माण होण्यामुळे मान्सुन  सक्रिय होऊन सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असल्याने शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.  
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments