Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अडीच एकर शेतीसाठी चौघांची निर्घृण हत्या

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:25 IST)
बाळापूर तालुक्यामधील बाखराबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अवघ्या अडीच एकर शेतीच्या वादातून भगवंतराव आणि विश्वनाथ माळी या दोन भावांच्या कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये माळी कुटुंबियांमधील एका महिलेसह चौघांचा समावेश आहे.

1998 मध्ये भगवंतराव माळी यांनी गजानन माळी यांच्याकडून अडीच एकर शेती खरेदी केली होती. मात्र त्यानंतर गजानन यांनी शेतीची खरेदी करुन देण्यास टाळाटाळ केली आणि अखेर हा वाद कोर्टात गेला होता. नुकताच याप्रकरणी हायकोर्टाने भगवंत माळी यांच्या बाजूने निकाल दिला.

निकाल आपल्या विरोधात लागल्याचा राग मनात ठेवत सोमवारी सायंकाळी गजानन माळी यांनी त्यांच्या दोन मुलांसह भगवंत माळी यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. यामध्ये विश्वनाथ बळीराम माळी (75), राजेश भगवंतराव माळी (37), योगेश भगवंतराव माळी (27) आणि वनमाला विश्वनाथ माळी (45) यांचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे ही सर्व घटना गावांतील नागरिकांसमोर घडली. मात्र, भीतीमुळे मदतीसाठी कोणीही सरसावले नाही. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गजानन माळी आणि त्यांचा मुलगा नंदेश याला अटक केली आहे. तर दीपक गजानन माळी हा आरोपी फरार झाला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments