Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमचा किमान एक तरी मंत्री बनवा

Webdunia
गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:36 IST)
येत्या ३१ ऑक्टोबरला होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी रिपब्लिकन पार्टीच्या किमान एका तरी व्यक्तीला मंत्री बनवावे, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
 
रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी एम.आय.जी. क्लबमध्ये झाली. या वेळी आठवले यांनी ही मागणी केली. आम्हाला किमान चार मंत्रिपदे देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे तीन ते चार महामंडळांचे अध्यक्षपद देण्यात येणार होते. या आश्‍वासनांची पूर्तता झाली पाहिजे. महादेव जानकर तसेच राजू शेट्टी यांच्या पक्षाचा प्रभाव पश्‍चिम महाराष्ट्रापुरता आहे. आपल्या पक्षाचा प्रभाव संपूर्ण राज्यभर आहे. येत्या वर्षभरात नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत. दोन वर्षांनंतर मुंबई व ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. आम्हाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. रामदास आठवले, अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, गौतम सोनवणे, राजाभाऊ सरवदे आदींसह जवळ जवळ ४00 पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments