Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल महाराष्ट्राबाहेरच

Webdunia
नवी दिल्ली- आयपीएलचे 1 मे नंतरचे सामने आता महाराष्ट्राबाहेरच होतील. भीषण दुष्काळामुळे राज्यात होणारे आयपीएलचे सामने इतर ठिकाणी खेळवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
 
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचे महाराष्ट्रात होणारे 13 सामने इतर राज्यात खेळवण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने विनंती केल्याने 1 मे रोजी पुण्यात होणारा सामना खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तसेच आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, सामने खेळवण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रात पाणीटंचाई असताना आयपीएलचे सामने नको. भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments