Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:38 IST)
सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. 20 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 64 झाली आहे. त्यापैकी 16 शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळाली आहे.
 
रूई (ता. परांडा) येथील शेतकरी नवनाथ लिमकर (वय 65) याने बुधवार, 17 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नागराळ (ता. लोहारा) येथील युवा शेतकरी रवी राजेंद्र गोरे (व 22) याने नापिकी व कर्जबाजारपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळङ्खास घेऊन आत्महत्या केली. जानेवारी 2014 ते 20 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 64 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही आत्महत्याचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात 2014 मध्ये 20 डिसेंबरपर्यंत झालेल्या 64 आतमहत्यांपैकी केवळ 16 आत्महत्या शासकीय अर्थसहाय्यास पात्र ठरल्या आहेत. 13 आत्महत्यांचे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments