Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तळेगाव प्रकरण: 117 जणांना अटक, 7 व्हॉट्सअॅप अॅडमिनवर गुन्हे दाखल

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (17:51 IST)
तळेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलीसांनी 117 जणांना अटक केली आहे. तर नाशिक शहर आणि ग्रामीण असे दोघांना मिळून एकूण 53 गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सायबर क्राईम अंतर्गत 7 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअॅप अॅडमिन आणि फेसबुक वापरणाऱ्याचाही समावेश आहे. याशिवाय हिंसाचारात पोलिसांच्या वाहनासोबतच सुमारे 2 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. 
 
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घटल्या. दगडफेक आणि बस जाळण्यात आल्या. यासगळ्याप्रकारानंतर पोलीसांनी कडक कारवाई करत शांतता आणि सुव्यवस्था कायम केली आहे. सध्या नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. शाळा आणि बससेवा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरु आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. सदरची इंटरनेट सेवा शनिवारपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे संचारबंदी सुरु असलेल्या गावांमधील संचारबंदी शनिवारपासून शिथील करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
नाशिकमधील तणाव बघता अफवा आणि स्वतः तर्क वितर्क लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध नाशिक पोलिसांनी घेतला आहे.विविध कलमांतर्गत अफवा पसरवणे, दंगल पसरवणे, समजात अशांतता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे याअंतर्गत 7 अॅंडमीनवर गुन्हे पोलीस यंत्रणेने दाखल केले आहेत. याबाबत जिल्हा सायबर सेल अफवा पसरवणाऱ्यावर लक्ष ठेऊन होता. समाजात अशांतता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार दोषी आढळतील त्यांना तीन वर्षाची शिक्षा आणि रोख रकमेचा दंड अशी शिक्षा आहे.
 
एसटी महामंडळाचे सर्वाधिक नुकसान
नाशिकमधील तणावामध्ये सर्वाधिक नुकसान एसटी महामंडळाचे झाले आहे. या आंदोलनात तब्बल १९ एसटी बस जाळल्या. तर एसटी सेवा बंद राहिल्यामुळे महामंडळाला ३ कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
 
अॅट्रॉसीटीचे फक्त ६ गुन्हे दाखल
शहरामध्ये आंदोलनादरम्यान १०० पेक्षा अधिक अॅळट्रॉसीटीचे गुन्हे दाखल करण्यात आले अशी चर्चा होती. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. काही गावांमध्ये ठरावीक घरांना लक्ष करून हल्ले करण्यात आले आहेत. त्या नागरीकांच्या तक्रारीनुसारच त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अॅमट्रॉसीटीचे अवघे ६ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विनॉय चौबे यांनी दिली आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments