Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरोडेखोर गेले आणि भुरटे चोर आले, सदाभाऊंची भाजपवर टीका

Webdunia
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:28 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. राज्याला लुटणारे काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे दरोडेखोर गेले आणि भुरटे चोर सत्तेवर आले आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी भाजप सरकारवर टीका केली.

भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी काय करते ते पाहू अन्यथा आपला रस्त्यावरचा मार्ग मोकळा, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे.

श्रीरामपूर येथे ऊस व दूध परिषदेत सदाभाऊ बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने मला मंत्री केले किंवा नाही केले तरी शेतक-यांच्या प्रश्नालाच पहिले माझे प्राधान्य राहील. मंत्री झाल्यावर कारखानदारीच्या माध्यमातून शेतक-यांना लुटणा-या साखर सम्राटांच्या संपत्तीची चौकशी करायला लावू. भाजपने चोर बरोबर घेऊन राजकारण करू नये. या सरकारने प्रथम दुष्काळाने होरपळलेल्या राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करावीत तसेच संपूर्ण वीज बिले माफ केली पाहिजेत अन्यथा मंत्री केल्यानंतरही त्यावर लाथ मारू असेही खोत यांनी सांगितले. 15 वर्षे संघटनेने आंदोलन केले. दहा हजार कार्यकर्ते तुरुंगात गेले. त्यामुळे सरकार बदलल्याचे खोत म्हणाले.  

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments